
घाटकोपर येथील अंजली अहिरे फिल्मी कलाकारांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्काराने सन्मानित
निफाड प्रतिनिधी – श्री रामभाऊ आवारे
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे कारण त्यांचा सन्मान पुरस्काराने दिला तर निश्चितच त्यांच्या कार्यासाठी प्रेरणा मिळते हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अमरावती दि १७ ऑगस्ट 2025 रोजी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे अशी माहिती बीएसएफ बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांनी दिली आहे.बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजक्रांती पुरस्कार सोहळ्यात घाटकोपर येथील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या अंजली रंजित अहिरे श्री स्वामी समर्थ नाश्ता कट्टा चालवत असुन गरजू व्यक्तिंना मदत करणे, सामाजिक कार्य करणे, समाजात घडणार्या चुकीच्या गोष्टी वर आवाज उठवणे, लहान मुलांसह वेळ घालवणे, आई वडिलां सोबत वेळ घालवणे, इतिहास कालीन गोष्ठी वाचणे, फिरणे हे छंद आहेत. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक फिल्म स्टार, रील स्टार, निर्माते दिग्दर्शक, अभिनेता अभिनेत्री यांच्या उपस्थिती मध्ये व संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतिने हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.१७ ऑगस्ट ऐतिहासिक दिवस…! निमित्त राष्ट्रसंत स्वच्छतेचे जनक गाडगे बाबांच्या पुण्यपावन भुमी अमरावती मध्ये समाज क्रांती पुरस्कार सोहळा पार पडला यास सबंध विश्वाला ज्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला… अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर जनप्रबोधन केले… समाजाचे उत्खनन करून समाजप्रबोधन करून जागृती केली. असे महान संतश्रेष्ठ आदरणीय गाडगेबाबा च्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहूमहाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई लोकशाहीर आण्णाभाऊ, राष्ट्रसंत कबीर महाराज अशा विविध राष्ट्रपुरुषांच्या पावन राष्ट्रात हा सोहळा संपन्न झाला.
संपादक – डॉ शाम जाधव



