

*१७ ऑगस्ट ऐतिहासिक दिवस…! निमित्त राष्ट्रसंत स्वच्छतेचे जनक गाडगे बाबांच्या पुण्यपावन भुमी अमरावती मध्ये समाज क्रांती पुरस्कार*…..!
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
अमरावती आज दिनांक १७/८/२०२५ रोजी बी.एस. एक बहुउदेदशीय संस्था अमरावती व श्रीसंत कबीर बहुउदेशीय संस्था बुलढाणा आणि उपेक्षित नायक यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा नियोजित समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२५ नाशिकचे ८ रत्न यांना सन्मानित करण्यात आले ब्रॅन्ड सरदार यांचा अप्रतिम कार्यक्रम अमरावती मधील प्रख्यात साई पॅलेस हॉटेल च्या भव्य ए. सी. असलेल्या प्रशस्त सर्व सोयी सुविधायुक्त वातावरणात अनेक प्रख्यात सिनेसृष्टीतील मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असुन कार्यक्रमाची सुरुवात जबरदस्त झाली. हा एक आविस्मरणीय सोहळा ठरेल यात शंका नाहीअन् संपूर्ण महाराष्ट्रात होणार एकच भुषणावह चर्चा…. भुषण सरदार….! ब्रॅड अमरावतीचा…! गौरव महाराष्ट्राचा…..!तीन चार महिण्यापासून…. एका ध्येयांने वेडा पिसा झालेला २६ वर्षे वयाचा तरुण…यास सबंध विश्वाला ज्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला… अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर जनप्रबोधन केले… समाजाचे उत्खनन करून समाजप्रबोधन करून जागृती केली. असे महान संतश्रेष्ठ आदरणीय गाडगेबाबा च्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहूमहाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई लोकशाहीर आण्णाभाऊ, राष्ट्रसंत कबीर महाराज अशा विविध राष्ट्रपुरुषांच्या… विचाराने प्रेरीत होऊन… अत्यंत अल्प वयात… अगदीच तारुण्यांच्या उबंरठ्यावर पदार्पण करीत असतांनाच… सामाजिक कार्यात पडलेले……. महाराष्ट्राचे भुषण… !अर्थात अमरावतीचा हिरो… ! भुषण सरदार सर….!संपुर्ण विदर्भात आपल्या कार्याचा झंझावात सुरु करून . आत्महत्या ग्रस्त शेतकर्याच्या मुलापासून अंध, अंपग ( दिव्यांग ) विधवा, परितक्या, शोषित, पिडीत, असलेल्या वंचित असलेल्या उपेक्षितांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असणारा हा जागरूक नायक समाज क्रांती पुरस्कार खालील मान्यवरांना देण्यात आले.राजनंदिनी अहिरे, मनिष मुथा पत्रकार, डॉ.शाम जाधवपत्रकार, डॉ. संदीप काकड पत्रकार ,पत्रकार रामचंद्र ताठे, प्रवीण जाधव, पत्रकार रामभाऊ आवारे, पत्रकार मुकुंद आव्हाड, देविदास साळवे, पत्रकार रमेश गिरी, पत्रकार सुरेखा गांगुर्डे, राजूभाऊ सातपुते यांना समाजरत्न क्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले






