
नाशिक आवाज लेखणीच्या राज्यस्तरीय काव्य संमेलन व सन्मान सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी , डॉ. शाम जाधव
नाशिक. आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती व उपेक्षित नायक न्यूज संयुक्त विद्यमाने ओझर येथे पुस्तकांचे हॉटेल या ठिकाणी आवाज लेखणीचा हे राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये कविवर्य ॲडव्होकेट महेंद्र बर्वे सर इगतपुरी धामणगाव यांनी आपली कविता सादर केली मुख्य आयोजक भूषण सरदार, वैशाली सोनवणे, अश्विनी सांगळे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव नागरे, डॉक्टर अश्विनीताई बोरसे, नितीन डांगळे काव्य संमेलनाचे अध्यक्ष नंदू सानप, विशेष उपस्थिती अभिनेत्री केतकी गावंडे, सचिन अहिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा पार पडला एकूण ४३ कवी रसिक प्रेमिकांनी सहभाग घेतला होता वेगवेगळ्या प्रकारच्या कविता कवी रसिक यांनी सादर सादर करून आलेल्या प्रमुख पाहुणे व रसिक कवी यांना मंत्रमुग्ध केले केल्या


