
आवाज लेखणीच्या राज्यस्तरीय काव्यसंग्रह सन्मान सोहळा येवला येथील अश्विनी सांगळे यांना जनहित पुरस्कार सन्मानित
नाशिक प्रतिनिधी – मनीष मुथा कार्यकारी संपादक
नाशिक. आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती व उपेक्षित नायक न्यूज संयुक्त विद्यमाने ओझर येथे पुस्तकांचे हॉटेल या ठिकाणी आवाज लेखणीचा हे राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते सत्यशोधक पत्रकार पुरस्कार मा.सौ अश्विनी सांगळे यांना सन्मानित केले. मुख्य आयोजक भूषण सरदार, वैशाली सोनवणे, अश्विनी सांगळे संपूर्ण उपेक्षित नायक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अशोकराव नागरे, डॉक्टर अश्विनीताई बोरसे, नितीन डांगळे काव्य संमेलनाचे अध्यक्ष नंदू सानप, विशेष उपस्थिती अभिनेत्री केतकी गावंडे, सचिन अहिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा आलेल्या सर्व पाहुण्यांचे कवियत्री यांनी आपल्या लेखणीतून त्यांचे विचार जगापुढे मांडण्याचा निर्धार करून आलेल्या प्रमुख पाहुणे व रसिक कवी यांना मंत्रमुग्ध केले.



