Maay Maulee News
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
Maay Maulee News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गिरीश महाजन यांनी नाशिककरांची माफी मागून तातडीने वृक्षतोड रद्द करावी – आम आदमी पार्टी ची मागणी.

डॉ संदीप काकड by डॉ संदीप काकड
December 1, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*गिरीश महाजन यांनी नाशिककरांची माफी मागून तातडीने वृक्षतोड रद्द करावी.*: आम आदमी पार्टी

माय माऊली न्यूज संपादक डॉ. शाम जाधव

नाशिक: आज रविवारी, सकाळी ११ वाजता आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत ,अँड प्रभाकर वायचळे, नाविंदर अहलुवालिया ,शहर अध्यक्ष अमोल लांडगे ,महिला शहर अध्यक्ष शेतांबरी आहेर ,शहर संगठक अनिल कौशिक ,युवा शहर अध्यक्ष अमर गांगुर्डे ,व उपाध्यक्ष गणेश निर्भवणे , सहसंगठन प्रमुख माजिद पठाण प्रमुख ,योगेश कापसे ,गोरख मोहिते ,कलविंदर गरेवाल , राज कुमावत ,रघुनाथ चौधरी व इतर शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तपोवन नाशिक येथील प्रस्तावित खाजगी साधुग्राम आणि वृक्षतोड ठिकाणी भेट दिली.यावेळी राज्य पदाधिकारी व राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की ‘गिरीश महाजन व प्रशासनाच्या बोलण्यात सत्याचा अंश किती हा मुख्य प्रश्न आहे. वृक्ष अधिनियम १९७५ कलम ५अ प्रमाणे एकास दहा झाडे असे नसून त्या वृक्षाच्या वय वर्षे इतके वृक्ष लावणे आवश्यक आहे. म्हणजे एखादे झाड ३० वर्षे जुने असेल तर ३० झाडे लावणे , ती सुद्धा किमान ६ फूट उंचीची , १५ दिवसांच्या आत आणि किमान ७ वर्षे त्याची निगा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गिरीश महाजन जे आश्वासन देत आहेत तेच मुळी कायद्यास धरून नाही.”दुसरी बाब म्हणजे या बाबतीतील प्रत्यक्ष अनुभव काय आहे? २०१७ मध्ये जो पुणे नाशिक महामार्ग बांधला त्यावेळेस वृक्ष कापले गेले त्याच्या बदल्यात ३९ हजार वृक्ष २०२५ मध्ये सुद्धा लावले गेले नव्हते, त्या बाबतीत राष्ट्रीय हरित लवादाने फेब्रुवारी मध्ये ताशेरे ओढले आहेत. तर पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर १लाख झाले लावण्याचे काम टोल कंत्राटदाराला दिलेले असूनही आज २० वर्षानंतर ४०००० झाडे सुद्धा नाहीत. आणि मध्यंतरी समोर आलेली गंभीर बाब म्हणजे पुण्यात २० महिन्यात २२३६२ झाडे कापली गेली, भरपाई म्हणून ३,४०,००० झाडे वाढवायची होती तर त्याची कोणतीही माहितीच संकलित नाही.हीच स्थिती नाशिक मुंबई पालिकेतही आहे. आणि ५२ कोटी वृक्ष लागवडीचे काय झाले ते फक्त मुनगंटीवार यांनाच माहीत असावे.हिंदू आणि इतर सर्वच धर्मात नदी, सूर्य याला पूजिले जाते तसेच वड, शमी, पिंपळ आदी वृक्षांची पूजा केली जाते. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा वृक्षवल्लीचे महत्त्व सांगितले आहे. वृक्ष कापणे हे पाप असे शंकराचार्य सरस्वती यांनी पण म्हंटले आहे.आता तर प्रशासन निर्लज्ज पणे तिथे २२० कोटींचे एक्झिबिशन सेंटर उभे करू म्हणते आहे. मग ही साधूग्राम म्हणत संतभूमी, तपोवन नष्टच करणार होतात तर मग कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे का? १२ वर्षांनी साधूंच्या मुक्कामासाठी कोणते ठिकाण असेल? खाजगी साधुग्राम म्हणजे पीपीपी मॉडेल हे भाजप चे धर्मकारण आहे का? असा प्रश्न मुकुंद किर्दत यांनी केला आहे.ही सर्व फसवाफसवी आणि मोठी कंत्राटे यातील हितसंबंध हेच वास्तव असून गिरीश महाजन यांनी नाशिकवासियांची आणि साधूंची पण माफी मागायला हवी. भाजप चे ट्रिपल इंजिन म्हणजे स्थानिक पालिका पातळीवर राज्याचे निर्णय जबरदस्ती लादणे आहे अन्यथा भाजप ने नाशिककरांच्या भावनांचा आदर करावा असे आवाहन आम आदमी पार्टी ने केले आहे. आम आदमी पार्टी, महाराष्ट्र

Previous Post

माता रमाबाई आंबेडकर विद्यालय संविधान दिना निमित्त शालेय वस्तू वाटप

Next Post

श्री दत्तगुरु जयंती निमित्त सिद्धी नगर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

डॉ संदीप काकड

डॉ संदीप काकड

Next Post

श्री दत्तगुरु जयंती निमित्त सिद्धी नगर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी माजी विध्यार्थी चा 29 वर्षानंतर स्नेह मेळावा

August 5, 2025

आज नाशिक नगरीत रंगणार महाराष्ट्र जीवन गौरव रत्न पुरस्कार सोहळा व दैनिक भारत नॅशनल न्यूज चॅनेल उदघाटन सोहळा.

October 25, 2025

14 वर्षा खालील जिल्हा स्तरीय खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद

September 27, 2025

मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन प्रथम वर्धापन दिन, मायमाऊली न्यूज व दैनिक भारत न्यूज उदघाटन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

October 27, 2025

प्रा. किशोर लहारे यांना राष्ट्रीय पातळीवरिल साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

2
राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

0
कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

0
समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

0

तक्षशिला महाविद्यालय आयु. एन बी पगारे साहेब ॲड डॉ. उषा एन.पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

January 26, 2026

नाशिकरोड येथे तुळजाभवानी मंदिर रथसामाप्ती व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न.

January 26, 2026

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन वर्धापन दिनानिमित्त बागलाण तालुका टीम च्या वतीने अनोखा उपक्रम.

January 24, 2026

सौ प्रिया अँटॉनी पाटोळे यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

January 24, 2026
Facebook Twitter Youtube RSS
Maay Maulee News

वेळेवर, अचूक आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी तुमचा विश्वासार्ह स्रोत. आमचे ध्येय म्हणजे जगभरातील नवीनतम अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि खोली यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Popular Category

  • Uncategorized
  • कविता
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय
  • सामाजिक
  • साहित्य

Contact Info

  • Address – makhamlabad, panchavati, nashik Maharashtra
  • Contact no. – 9921390038
  • Whatsapp no. – 9421103368
  • Email id- sandipvkakad123@gmail.com

© 2025 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved.